अस्वस्थ झालेली भिरभिरतेच्या नजरेची अनेक तरूण मुले इतरत्र बेकार फिरतात. त्यांना त्यांच्या जगण्याचा अर्थ शोधावयाचा असतो. काहीतरी वेगळे करावे, चार चौघांपेक्षा निराळे जगावे असे वाटत असते. अनेकांच्या मनात देशासाठी, समाजासाठी काहीतरी करण्याची प्रामाणिक उर्मी असते. प्रश्न असतो 'फक्त आम्ही काय करू?' या प्रश्नाला एकच एक उत्तर असे नाही. जे करावेसे वाटते त्याला कडाडून भिडणे आणि ते करून पहाणे, हाच त्यावरचा उपाय आहे. असे करून पाहिले की तुमचे तुम्हालाच कळेल की खरेच मला हे करावयाचे होते का? त्यासाठी आवश्यक क्षमता माझ्यात आहे का? त्यासाठीची किंमत आपल्याला देता येते का? हाच माझा मार्ग आहे का? तुमच्या प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा तोच मार्ग आहे.
-विनायक थाळकर
Wednesday, November 18, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment